Tuesday, August 19, 2008

पुरंदर

प्रकार : गिरिदुर्ग

उंची : 1400 मी / 4590 फूट

जिल्हा : पुणे

तालूका : पुरंदर

उपनाम : -

श्रेणी : सोपी

छत्रपती संभाजी महाराज्यांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो किल्ला म्हणजे पुरंदर. याच किल्लयावर दि. 11 जून 1665 मध्ये जयसिंगांशी तह झाला त्याला पुरंदरचा तह म्हणून ओळखले जात. या तहात राज्यांना 23 किल्ले द्यावे लागले होते. हा किल्ला पुण्यापासून साधारणपणे 40 कि. मी. अंतरावर आहे. वज्रगड हा पुरंदरचा जोडकिल्ला. पुरंदर म्हणजे इंद्र ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य आहे त्याप्रमाणे हा किल्ला.

इतिहास

पुराणात या ज्या डोंगरावर पुरंदर आहे त्या डोंगराला इंद्रनील पर्वत म्हंटले जात होते. असे म्हणतात की हनुमान द्रोणगिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग येथे पडला व त्या भागातून हा डोंगर तयार झाला. इ. स. 1489 च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहंमद याने या किल्ल्यावर ताबा मिळवला. त्यानंतर इ. स. 1550 मध्ये तो आदिलशाहीत आला. त्यांनी तो महादजी निळकंठ यांच्याकडे सोपवला पण त्यांच्यात भावकीत भांडणे होते त्याचा फायदा घेऊन शिवाजी राज्यांनी हा किल्ला मिळवला.

आदिलशहाने फत्तेखानास शिवाजीचा बंदोवस्त करण्यासाठी पाठवले तेव्हा महाराज्यांनी या किल्ल्यावरून फत्तेखानाशी लढाई केली व त्यात यश संपादन केले. वैशाख शु 12 शके 1579 म्हणजेच 16 मे 1657 साली संभाजी महाराज्यांचा जन्म याच किल्लयावर झाला. इ.स. 1665 मध्ये मोगलांचे सरदार जयसिंगांनी पुरंदराला वेढा दिला. तेव्हा मुरारबाजी देशपांडे आणि जयसिंगांचे घनघोर युध्द झाले. मुरारबाजी अतिशय शौर्याने लढला मात्र जयसिंगांच्या अफाट फौजेपुढे त्याला आपले प्राण गमवावे लागले. मुरारबाजी जेव्हा रणांगणात पडला तेव्हा शिवाजी राज्यांनी जयसिंगांशी तहाचे बोलणे केले व यातून परंदरचा तह झाला. मात्र पाचच वर्षांनी म्हणजे 1670 मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ल्यावर भगवा फडकवला. मात्र संभाजी राज्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने हा किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला. आणि त्याला आजमगड असे नाव ‍ठेवले. पुढे 1795 मध्ये छत्रपती शाहू महाराज्यांनी हा किल्ला पेशव्यांना दिला. या किल्ल्यावरच सवाई माधवराव पेशवे यांचा जन्म झाला.

स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे हा किल्ला लष्कराच्या ताब्यात होता आता तेव्हा परवानगी घेऊनचा किल्ला पाहता येत होता आता मात्र हा किल्ला सर्वांसाठी 24 तास खुला आहे.

पाहण्यासारखी ठिकाणे :

बनी दरवाजा रामेश्वर मंदिर खंदकडा पुरंदरेश्वर मंदिर दिल्ली दरवाजा केदारेश्वर पुरंदर माची भैरवखिंड तसेच वीर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा इ. प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

राहण्याची सोय :

येथे अनेक पडक्या वास्तू आहेत त्यात राहण्याची सोय होऊ शकते पावसाळा सोडून

पाण्याची सोय :

किल्यावर 12 माहि पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

जेवणाची सोय :

किल्ल्यावर दोन तीन हॉटेल्स आहेत त्यात राहण्याची सोय होऊ शकते.

जाण्याच्या वाटा :

किल्याच्या वरपर्यंत गाडीने जाता येते तसेच पायवाटेनेही जाता येते. एस. टी. ने सासवड पर्यंत गाडी आहे तेथून किल्यावर जाता येते.

2 comments:

Unknown said...

Thank's for the your information about The "PURANDAR".As per your information there are two hotels on the fort but you'r absoulutely wrong there is only one hotel(House),and any person can't leave there due inconvinience if you want to write about the fort.So,please mention for the development/repair/reconstruction of the fort "PURANDAR".I'm also a "Shivpremi/Shivabhakta" but I'm always staying far from the "Polytix".
Waiting for the reply.
Vaibhav Laitbar
Karad
(vaibhav_1022@rediffmail.com)

Unknown said...

Thank you vAIBHAV



HGAXH AHGA UWQSH GW