प्रकार : गिरिदुर्ग उंची : 1403 मी / 4604 फूट
जिल्हा : पुणे
तालूका : वेल्हा
उपनाम : प्रचंडगड
जाण्याचा रस्ता : मध्यम कठीण
शिवाजी महाराजांनी सुरूवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यातील तोरणा हा एक किल्ला. या गडावर तोरणा जातीची ख़ूप झाडे असल्यामुळे या गडाला तोरणा हे नाव पडले. शिवरायांनी जेव्हा या गडाची पहाणी केली तेव्हा त्यांना हा किल्ला प्रचंड दिसला म्हणून त्यांनी या किल्याला प्रचंडगड हे नाव दिले. तोरणा हा पुणे जिल्हातील सर्वाधिक उंचीचा किल्ला आहे.
इतिहास
हा किल्ला कोणी व कधी बांधला याचे पुरावे दुर्दवाने आज उपलब्ध नाहीत. इ. स. 1470 ते 1486 च्या काळात बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. त्यानंतरच्या काळात हा किल्ला निजामशाहीत गेला. इ. स. 1647 मध्ये शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी हा किल्ला स्वराज्यात सामावून घेतला. आपल्या हाती आल्यावर महाराजांनी हा किल्ला आणखी मजबूत करण्यास घेतला. तेव्हा कामगारांना एका ठिकाणी खणताना 22 हंडे सोन्याच्या मोहरा सापडल्या. त्यातील 5 हजार होन इतका खर्च त्यांनी या किल्लावर केला. पुरंदरच्या तहाच्या वेळी महाराज्यांनी आपल्या संभाषण कौशल्याने हा किल्ला खासकरून आपल्याकडेच राखून ठेवला.
पुढे संभाजी महाराज्यांच्या निधनानंतर इ. स. 1704 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. औरंगजेबाने लढाई करून जिंकून घेतलेला हा एकमेव किल्ला आहे. तेव्हा औरंगजेबाने या किल्याचे नाव ‘फुतुउल्गैब’ म्हणजे ‘दैवि विजय’ असे ठेवले. त्यानंतर चारच वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर भगवा फडकवला. यानंतर तोरणा कायम स्वराज्यात राहीला.
पाहण्यासारखी ठिकाणे :
पुणे जिल्हातील सर्वात उंच व विस्ताराने मोठा किल्ला असल्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी दीड दिवस लागतो. बिनीचा दरवाजा, कोकण दरवाचा, तोरणाजाई व मेंगाई मंदिर, झुंजारमल माची, हनुमान बुरूज, बुधला माजी, माळेचा बुरूज इ. प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. किल्ल्यावरून राजगड सिंहगड किल्ले दिसतात.
राहण्याची सोय :
मेंगाई देवीच्या मंदीरात साधारपणे 50 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. तसेच शासनातर्फे गडावर पर्यटन निवासही बांधण्यात येत आहे.
पाण्याची सोय :
येथे 12 माही पाण्याचे टाके आहेत. मात्र उन्हाळ्यात पिण्याचे पाण्याची कमतरता असते.
जेवणाची सोय :
गडावर रखवालदार एक छोटेसे हॉटेल चालवतो. मात्र त्यात आपल्याला गरमागरम भजी व चहा मिळेल.
जाण्याच्या वाटा :
गडावर जाण्याच्या 3/4 वाटा आहेत. वेल्हा पर्यंत एस. टी. महामंडळाची पहिली बस सकाळी 6.30 वाजता स्वारगेटपासून सुटते. त्यानंतर दर एक तासाला बस आहे. वेल्ह्याहून पुण्याला यायला शेवटची बस संध्याकाळी 5.30 वाजता आहे. गडावर जायला एक वाट गावातून आहे तर दुसरी वाट गावाच्याच उजव्या बाजूला एक ओढा वाहतो तो ओलांडून गेल्यावर गडावर जाता येते. गडावर जायला अंदाजे 3 तास लागतात.
राजगड तोरणा अशीही एक वाट आहे पण या वाटेने तोरण्यावर पोहोचायला अंदाजे 6 तास लागतात.
****************